चार दिवसांचा संसार-(भाग ४) | Marathi Incest Story

मग ठरल्याप्रमाणे आदित्य करमला आपल्या घरी घरच्यांशी ओळख करण्यासाठी घेऊन येतो. “सिंघवी हाऊस” नावाचं आदित्यचं सिनेमात दाखवतात तसं एखाद्या हवेली सारखं मोठं आलिशान घर व आतील तामझाम पाहून करमचे तर डोळेच दिपतात. उभ्या आयुष्यात त्यानं असं भपकेबाज घर फक्त सिनेमातच पाहिलं असतं. तसंही एक किन्नर असल्यामुळे जिथं कुणी साधं आपल्या आसपास फिरकूही देत नव्हतं तिथं घरात घेऊन जाणं तर खूपच लांबची व अशक्यप्राय गोष्ट असल्याने क्षणभर आपण स्वप्नात तर नाही ना असा विचार करत स्वतःलाच एक चिमटा काढतो.

अर्थात, असं जरी असलं तरी आपल्या सारख्या किन्नरालाही मन आहे, भावना आहेत व किन्नर असलो तरी आपणही इतरांसारखेच हाडामांसाचे बनलेलो आहोत याची जाण ठेऊन एक माणूस म्हणून स्वीकारून आपल्याशी मैत्री करत, आपलं प्रेम देत थेट संसारगाठ बांधू पाहणाऱ्या आदित्यचं मनच त्याला त्या घरापेक्षा खूप मोठं वाटतं. त्यामुळे करमही मनाशी आदित्य आणि त्याच्या परिवारावर आपण आपला जीव ओवाळून टाकत प्रेम द्यायचं आणि आदित्यची पत्नी व सिंघवी परिवाराची सून म्हणून सारी कर्तव्ये आनंदाने व इमाने इतबारे, जबाबदारीनं पार पाडायची असा ठाम निर्णय घेतो.

जेव्हा आदित्यच्या घरचे गरीब करमला पाहतात तेव्हा त्याची आकर्षक पण एकदम साधी रहाणी, त्याचं दिसणं, वागणं-बोलणं आदी पाहून मनातून त्याचा तिरस्कार करत व आपल्या मुलाची मतीच भ्रष्ट झाली आहे अशी मनातल्या मनात स्वतःच्या मुलाला दूषणं देत पण वरकरणी तसं जराही भासवू न देता चेहऱ्यावर खोटी आपुलकी दाखवून करमची विचारपूस करतात व शेवटी आपल्या मुलाची खुशी तीच आमची खुशी असं वरवर सांगत हे लग्न इतर लग्नांसारखं नसल्यामुळे काही कठोर अटी शर्थी घालत करमला आपली सून म्हणून स्वीकारायला तयार होतात. अर्थात, त्यांनी घातलेल्या अटी शर्थी जरी आदित्य आणि करमला मनातून मान्य होत नसल्या तरी त्यांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली हेच खूप झालं असा विचार करून ती दोघं फार काही बोलत नाहीत.

सिंघवी परिवाराची सून एक किन्नर आहे ही गोष्ट बाहेर जगजाहीर होऊ नये म्हणून नात्यातील, मित्रपरिवारातील व बाहेरच्या कुणालाही आमंत्रण न देता फक्त आदित्यच्या घरातील कुटुंबियांच्या व करमच्या गुरुमाईच्या आणि त्याला लहानपणापासून मायेनं सांभाळणाऱ्या त्या किन्नर पालकाच्या उपस्थितीतच आदित्य आणि करमचा विवाह होतो व अखेर माप ओलांडून करम खऱ्या अर्थाने एक जीवनसाथी बनून आदित्यच्या आयुष्यात आणि सून म्हणून सिंघवी परिवारात सामील होतो.

स्पेशल कथा वाचा :  सासूची काळजी-(भाग ८)

मग ती मिलनाची रात्र येते. आधी जशी दोन मनं एक झाली तशी आता दोन शरीरं एक व्हायची वेळ समीप आली असते. आदित्यच्या शय्यागृहातील गुलाबाच्या पाकळयांनीं सजवलेल्या त्या मखमली शेजेवर करम आदित्यची आतुरतेने वाट पहात असतो. थोड्या वेळाने आदित्य खोलीत येऊन करमच्या जवळ बसतो तेव्हा लाजून करम मागे सरकतो मग आदित्य आणखी जवळ सरकल्यावर तो आणखी मागे सरकतो. शेवटी न रहावून करमला आपल्याजवळ ओढून बहुपाशात घेत आदित्य त्याच्या ओठांचं दीर्घ चुंबन घेतो. त्या एका चुंबनाने करमच्या शरीरात प्रणयाची गोड शिरशिरी उमटते. मग हळूहळू तोही आदित्यला प्रतिसाद देऊ लागतो. मग मात्र खऱ्या अर्थाने दोघांचं प्रणयाराधन सुरू होतं. करमच्या गव्हाळ, आकर्षक शरीराची प्रत्येक गात्रं व त्याचा आत्मा रांगड्या आदित्यच्या चुंबनांच्या वर्षावात न्हाऊन निघतो. नंतर हळूहळू दोघांची शरीरे वस्त्रांतून पूर्णपणे मुक्त होवून रतीक्रिडेत गरम उसासे सोडत शृंगाराच्या त्या परमोच्च क्षणी खऱ्या अर्थाने एकमेकांत एकरूप होऊन जातात.

करमला आदित्यच्या रूपाने आज खऱ्या अर्थाने ते सर्व मिळतं ज्याची त्याने कधी स्वप्नातही कल्पना केली नसते. शृंगार केल्यावर थकून त्याला आपल्या कुशीत घेऊन शांत झोपलेल्या आदित्यकडे एकटक पाहत विचार करत असताना नकळत त्याच्या डोळ्यांतून पाणी येतं. एक किन्नर म्हणून जन्म घेतल्यामुळे लहानपणापासून ते अगदी काल पर्यंत म्हणजे आदित्य आयुष्यात येईपर्यंत आपण किती हालअपेष्टा भोगल्या, समाजाने सतत दिलेल्या हेटाळणीच्या, कुत्सितपणाच्या, अपमानाच्या वागणुकीमुळे आपल्याला किती यातना सहन कराव्या लागल्या याचा एक धावता पटच जणू करमच्या डोळ्यांसमोरून जातो. परंतु, आता मात्र ते दिवस कायमचे सरले. आजपासून इतरांसारखंच आपणही नव्या आयुष्यात पाऊल टाकलं आहे जेथे आता आपल्याला आपल्या हक्काच्या माणसांचा भरपूर सहवास, प्रेम व आपुलकी मिळेल, सम्मान मिळेल, स्थैर्य मिळेल व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजवरच्या आपल्या भरकटलेल्या, भविष्यहीन जगण्याला एक दिशा मिळेल, अर्थ मिळेल. अश्या विचारांच्या तंद्रीत रात्रभर हरवल्यामुळे पहाटे कुठे त्याचा डोळा लागतो.

दुसऱ्या दिवसाच्या रम्य सकाळी उगवणाऱ्या सूर्याची स्वच्छ कोवळी किरणे त्या शय्यागृहाच्या उघड्या खिडकीतून आत येत थेट आदित्यच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे त्याला जाग येते. जेव्हा तो ती किरणे त्याला बिलगून झोपलेल्या करमच्याही निमगोऱ्या, रेखीव विवस्त्र शरीरावर पडलेली पाहतो तेव्हा त्याची मुळचीच रेखीव काया त्या प्रकाशात किती सुंदर दिसत आहे असा विचार करून गाढ झोपलेल्या करमच्या ओठांचं प्रेमानं एक दीर्घ चुंबन घेऊन बाथरूम मध्ये फ्रेश होऊन कामावर जाण्याची तयारी करण्यासाठी म्हणून निघून जातो.

स्पेशल कथा वाचा :  चौरंगी रिंगण भाग 17

दरम्यान, आदित्य आणि करमचं लग्न होऊन आठवडा होतो. आदित्यच्या घरचे जरी वरवर करम विषयी आपुलकी दाखवत असले तरी मनातून ते त्याचा प्रचंड दुस्वास करत असत. त्यांना त्याची अत्यंत घृणा वाटे. अर्थात, लहानपणापासूनच जगाचा वाईट अनुभव घेत घेत मोठं झालेल्या करमच्या अनुभवी नजरेतून मात्र ही गोष्ट अजिबातच सुटली नसल्यामुळे त्याच्या सोबतच्या त्यांच्या अंतर ठेवून व हातचं राखून वागण्या बोलण्याच्या व्यवहारामुळे त्याच्या त्यांच्याविषयी वाटणाऱ्या या मतावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच होत होतं म्हणा. पण आदित्यकडे पाहून करम त्यांना काही बोलत नसे व उगाच आपल्यामुळे त्यांच्यात पुन्हा वाद नकोत म्हणून आदित्यलाही त्याबाबत काहीही सांगत नसे.

इतकेच नव्हे, त्यांच्याकडे नातेवाईक, मित्र वा बाहेरील कुणी पाहुणे आले की करमला तो तृतीयपंथी असल्यामुळे त्या पाहुण्यांमसमोर यायला हर्षवर्धनरायांनी लग्नाला परवानगी देताना घातलेल्या अटींनुसार बंदी घातली असते. इतकंच काय, साधं किचनमध्ये व देवघरातही जायला त्याला मनाई केली असल्यामुळे बिचाऱ्या करमची त्या घरात भयानक घुसमट होत असते. एक दोन वेळा संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर आदित्य त्याला त्याच्या चेहऱ्यावरील कष्टी भाव पाहून तसं विचारतोही परंतु, मोठ्या शिताफीनं ती घुसमट तो आदित्यला जराही कळू न देता उलट, त्याच्या घरचे आपल्याशी खूप चांगले वागतात, आपल्याला समजून घेतात असं खोटंच त्याला सांगतो.

क्रमशः💐

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!