“वाट पाहून खरंच कंटाळा आला मामा.” कार मध्ये बसत रेणू म्हणाली.
तिच्या आत्याचे मिस्टर ज्यांना ती मामा म्हणायची ते तिला त्यांच्या घरी घेऊन चालले होते. प्रवास सुरु झाला मामा हायवे नेहमीच्या सवयीने उरकू लागले.
“होना उशीरच झाला खरा. अगं मी आलो असतो लवकर पण त्या कमिटीची मिटिंग लय लांबली. मला खूप काळजी वाटत व्हती खरंतर. तुला किती यळ वाट बघायला लागतीये. पण नशीब लवकर उरकलं. लगेच निघालो. इथं अंधार पण लगीच पडतो एकतर. बरं ते जाऊदे भूक लागली असल तुला. पुढं यखाद्या हाटेलात जेऊन घिऊ आणि मग जाऊ. घरी जास्तवर 2 तास लागतील. त्यात तुजी आत्या गेली आश्रमात उद्या कसला तर कार्यक्रम हाय तिकडं. ” मामा तिला सांगत होते.
“वाट तर खूप बघावी लागलीये कशाची ते मात्र अजून समजायचंय…” रेणू स्वतःशीच म्हणाली.
रेणुका 29 वर्षांची विवाहिता तिच्या आत्याच्या गावी चालली होती. तिकडे तिच्या एका जुन्या मैत्रिणीचा साखरपुडा होता तो तिला अटेंड करायचा होता. तीचा नवरा येणार होता पण काही तातडीच्या कामाची अडचण असल्यामुळे त्याला जमले नाही. तीचा तिच्या आत्याला गावी येत आहे असा कॉल झाल्यावर तिला आत्याने सांगितले कि मामा तुमच्या शहराजवळ त्यांच्या गावातल्या सहकारी बँकेच्या कमिटी मिटिंग साठी येणारेत. त्यांना तिथं भेट आणि त्यांच्या सोबतच ये. मामांना यायला मात्र तासभर उशीर झाला. ती बस स्टॅंडच्या बाहेर येऊन त्यांची वाट पाहत होती. शेवटी ते भेटले.
गबाजी केंजळे. तिच्या आत्याचे मिस्टर त्यांच्या गावातली एक मात्तबर असामी. शेकडो एकर शेती उत्पन्न, स्वतः प्रयत्न करून उभारलेली सहकारी पतसंस्था, गावकीत मान सगळं काही होतं. केंजळे मामा सर्व काही पाहत मग्न आयुष्य घालवत होते. त्यांना दोन मुले एक शिकायला बाहेर आणि एक उच्च शिक्षण घेऊन करून जॉब साठी परदेशी. त्यांचं वय 55-60 दरम्यानच असलं तरी तब्येत आणि अंगकाठी रोजची शेतावरची रपेट आणि व्यस्त जीवन यामुळे मापात होती. ह्या आत्या आणि मामांचा रेणूवर जरा विशेष जीव होता. तिच्या आत्याच्या लग्नात चार वर्षांची असल्यापासून रेणुका त्यांच्या घरी जवळ जवळ दरवर्षी सुट्ट्यामध्ये जात राहिली. नंतर शिक्षण आणि लग्न ह्या कालखंडात थोडा फरक पडला पण जिव्हाळा मात्र आटला नाही. केंजळेना रेणू तितकीच जवळची वाटत.
रेणूच्या आयुष्यात आत्याचे मिस्टर म्हणजे सगळ्यात डॅशिंग आणि बिनधास्त पुरुष. तीला ते एखाद्या सिनेमातल्या गावाकडच्या हिरो सारखे वाटत. लहानपणीची त्यांची तिच्या नजरेत तयार झालेली प्रतिमा अजूनही तिला आवडत होती. कुठलंही काम एकदम तातडीने आणि आत्मविश्वासाने करण्याची पद्धत. त्यांची निर्णय क्षमता सिद्ध झालेली. त्यांचा सल्ला घ्यायला आणि मार्गदर्शन घ्यायला येणारी लोकं रेणुने कैक वेळा पाहिली होती. त्याचा निकाल नक्कीच सकारात्मक येत असणार म्हणून तर गावात त्यांना एवढा मान होता. आत्या अतिशय भाग्यवान आहे असेच तिला वाटत होते.
तिचं लग्न होऊन 5 वर्षे झालेली. अजून पाळणा हलला नव्हता. त्याला कारण तीचा नवरा गौरव. त्याचं असं म्हणणं होतं कि करियर मध्ये एक मजल राहिलीये तेवढी गाठली कि फॅमिली प्लॅन करू. त्याचं सगळं असं भीत भीत असायचं. बरं ती मजल गाठून सुद्धा आता वर्ष होत आलं होतं. प्रयत्न चालले होते ते ही तोकडेच कारण याला सतत कामाचा ध्यास आणि त्याजोगे आलेला ताण तणाव. रेणूला तिचे अपुरे पण खायला उठत. सदा गौरवच्या निरस कामसू आयुष्याचा कंटाळवाना भाग रेणूला त्रास देत असत.
” काय सोनूबाई कसल्या विचारात गुतल्या एवढ्या?” मामा तिला विचारत होते. तिची तंद्री तुटली. आत्याकडे तिला सोनू असं टोपण नाव लहानपणी मिळालं होतं. आत्याकडचे लोकं तिला त्या नावानेच बोलावित.
” तुमचं आयुष्य काय भारी आहे न मामा? ” ती थोडं उत्साहात म्हणाली.
” भारी?? म्हणजे? ” मामांनी विचारलं.
” म्हणजे असं रोज खूप लोकांना भेटायचं.. निरनिराळी कामे करायची, जबाबदारी घ्यायची ती पार पाडायची. तुमच्या शब्दाला वजन आहे. कसं सगळं जमतं हो तुम्हाला? ” तिने विचारले.
” दुरून तुम्हाला आमी हे सहज करतो असं वाटतं. पण तसं नसतंय.. लै त्रास करून घिऊन, सोसून हे आमी आंगवळणी पाडून घितलंय. त्यासाठी कष्ट केलेत बरीच वर्षे. आता सवयीचं झालं. जमतो हा व्याप संभाळायला. ” ते म्हणाले.
” आत्याला जाम अभिमान वाटतो पण तुमचा. तिच्या बोलण्यातून जाणवतं ते सतत. तुमचं नाव नेहमी काढत असते. एकदाही असं होतं नाही कि तुमचा विषय काढल्याशिवाय फोन ठेवते. तुम्ही दोघे खूप आदर्श नवरा बायको आहात. ” रेणू हे मनापासून बोलत होती.
” आदर्श! हंह!!” मामांनी मान झटकत सुस्कारा सोडला. त्यांचं लक्ष दुर रस्त्यावर होतं.
” हो तर.. तुमच्यात किती शांतपणे संभाषण असतं. मी कधी तुम्हाला आत्यावर चिडताना पाहिलं नाही कि तिने कधी तुमच्यामागे कुठली कटकट केलेली पाहिली नाही. सगळं कसं अगदी सरळ सरळ विना अडथळा. ” ती पुढे म्हणाली.
” सरळ सरळ वागणं.. कटकट न घालणं.. म्हणजे नवरा बायकोमधी सगळं सुरळीत असं सगळी म्हणतात नाय का? आपण बी तेच खरं धरून चालायचं… पण किती काळ? माणूस दुनियेशी झगडून सगळं लपवून ठिऊ शकतो. पण आतल्या आत चालू असलेली मारामारी त्याला कुर्ताडते. ” मामा काहीतरी वेगळंच बोलले.
” मामा?! असं का बोलताय? ” आज रेणूला मामा थोडे वेगळेच भासले.
” सोनू.. आमचं लग्न झालं अन तुझी आत्या काही दिवसात माझ्या आईबापाच्या गळ्यातला ताईत बनली. तिचं सरळ वागणं, जबाबदाऱ्या घेणं. सारखा घराचा आणि घरातल्या माणसांचा इचार करणं यात तिला मी पण संसाराचा भाग असल्यागत हुतो… येगळी अशी आमच्या दोगातली जाणीव तीनं मला कधी नीटशी होऊन नाय दिली. माझं लय मन होतं का आमी दोघांनी एकमेकांसोबत भरपूर यळ घालवावा. तुमी काय म्हणता त्याला…”क्वालिटी टायम!! ” का काय.. पण तिचं वागणं सगळं येकदम जबाबदार सुनेचं..आदर्श बायको, सून आण मुलगी बनण्याच्या ओघात ती एक प्रियसी बनायचं इसरली. ” मामा एवढं सगळं एका दमात बोलून गेले.
अरे बापरे मामा!! अहो हे सगळं तुम्ही कधी आत्याशी का बोलला नाहीत? मला खात्री आहे कि तिने नक्कीच समजून घेतलं असतं. तुम्ही एवढे दिवस असे गप्प कसे? ” तिला हा धक्काच होता.
” काय बोलणार व्हतो मी… तुझ्या आत्याला दोन नंदा आण येक दीर सगळे माझ्या पाठचे. त्यांचं समदं उरकता उरकता आमची पोरं झाली अन त्यांचं उरकतं अनुस्तवर आमची संध्याकाळ झाली आता.. ” मामा त्यांच्या झुबकेदार मिशीत हसत म्हणाले.
” हं.. बघा तुम्हीच म्हणाले कि आत्ता.. तुम्हाला दोन मुले झाली… ती कशी क्वालिटी टाइम शिवाय का?? ” रेणू मामांची खेचण्याच्या स्वरात म्हणाली.
” हा… तुला चांगला बनाव करता येतो शब्दाचा.. कळतंय मला. पण बरका सोनू.. ते जे काही होतं तो पयल्यावेळी झालेलं लग्न संस्कार म्हणून आणि दुसऱ्यावेळी माझ्या आयचं हिच्या मागे लागलेलं अजून येक होऊ द्या म्हून टूमणं… याला तू आयुष्यातल्या खाजगी चांगल्या आठवणी म्हणत असशील तर मग काय बोलायचं… ते पण एक कर्म म्हून समोरचं माणूस बगत असलं तर मग मी कशी त्याला गोड आठवण म्हणू? ” मामा थोडे खिन्न होत म्हणाले.
” हम्म.. बरोबर म्हणताय मामा तुम्ही. ” रेणू पण त्यांचा उदास स्वर सांगत असलेल्या भावना जाणत म्हणाली.
बोलत बोलत मामांनी एका नेहमीच्या हायवेवरच्या रेस्टोरंट मध्ये गाडी घातली.
“चल सोनू! जेऊन घेऊ ” ते म्हणाले.
तंद्रीतून जागी होत रेणुपण गाडीतून उतरली. अंगावरची साडी सावरत मामांच्या मागे ती रेस्टोटंट मध्ये गेली. ते त्यांच्या ओळखीतल्या व्यक्तीचेच असावे असे तिला वाटले. कारण समोर आलेल्या एका व्यक्तीने त्यांना साहेब म्हणत नमस्कार केला. त्या हायवेवर त्यांना एखाद्या गावात न ओळखणार माणूस कवचितच असेल असं तिला वाटलं आणि तिला त्यांचा त्या क्षणी खूप अभिमान वाटला.
दोघांनी एक टेबल अडवताच त्या हॉटेल मधल्या काउंटर वरचा मॅनेजर स्वतः तिथे आला.
“साहेब! काय म्हणता? नेहमीचीच अरेंजमेंट करायची ना?” मामांकडे आणि रेणूकडे किंचित मिश्किल कटाक्ष टाकत तो म्हणाला.
तसे चपापलेले केंजळे मामा रेणूच्या नजरेतून सुटले नाही.
” अरे! ए… सद्या.. च्यामारी.. काय नेहमीचंच.. भाची सोबत जेवायला आलोय.. पुढं घरी जाणारे. मेनू कार्ड आण जा. ” ते थोडे वैतागत म्हणाले.
तो लगबगिने मेनुकार्ड उचलून त्यांच्या टेबलाशी ठेवत निघून गेला. त्याला घाईत जाताना बघत रेणू मामांकडे पाहत म्हणाली.
” काय नेहमीच म्हणत होता तो?”
“अगं सोनू.. काय नाय.. बऱ्याचदा इथं आलो कि मी थाळी मागवतो. आज तू आहे तर काही यगळं मागवू.. नाय का? म्हणून त्याला बोललो.” ते काही लपवत बोलत होते हे त्यांच्या स्वरातून रेणूला जाणवलं.
“अच्छा!” तरीपण ती दुर्लक्ष करत म्हणाली.
रेणुने ऑर्डर देणाऱ्या पासून वाढणाऱ्या आणि खरकटी भांडी नेणाऱ्या सगळ्या माणसांना निरीक्षत ताडलं कि ते तिच्या कडे तिरक्या नजरेने वेगळ्याच समजुतीत बघत होते. ते वेगळेपण जाणण्याची अक्कल तिला नक्कीच होती. जेवताना मामांनी शक्यतो तिच्या सासरच्यांची आणि माहेरकडची चौकशी केली. ते खाल मानेनेच निमूट जेवत होते. जणू तिथे येण्याचा त्यांना पश्चाताप झाला होता. तिला जरा वेगळे वाटले.
जेऊन झाल्यावर वॉशरूम ला जाते असं म्हणत ती गेली. जरा पुढे मामांच्या नजरेआड गेल्यावर तिथे असणाऱ्या एका वेटर पोऱ्याला तिने खुणावले. तो गेला.
” त्यांना ओळखतॊस का? माझ्यासोबत आलेत त्यांना?” तिने त्याला जवळ तोंड नेत हळूच विचारलं.
” हा ते साहेब.. ओळखतो मी त्यांना. नेमी यतात.”
तो पोरगा म्हणाला.
” एकटे येतात कि कोणी आणखी असतं सोबत?” तिने विचारले. तसा तो थोडा गोरमोरा झाला. त्याने इकडे तिकडे पाहिले.
“मला… मला नाय माहित. ” तो चाचरला.
“हे बग तू जर मला काही सांगितलं नाहीस तर मी इथं आरडा ओरडा करेन आणि म्हणेन कि तू मला छेडतोय. सगळे जमा होतील आणि तुला बडवतील. मला सांग.. तुझं नाव कधीचं घेतलं जाणार नाही याची काळजी मी घेते.” तिने त्याला घाबरवले.
पोरगा गरीब आणि कोवळ्या मनाचा होता.
” लेडीज असतात… ” तो चाचरत बोलला.
” नेहमी एकच असते कि वेगवेगळ्या?” तिने विचारले.
तसा तो आणखी घाबरला. पण त्याला मिळालेली धमकी त्याच्या लक्षात होती.
“अं… नाय… वेगळ्या असतात.” तो म्हणाला आणि एवढेच सांगून तो तिथून लगबगिने सटकला.
विनाकारण मिळालेल्या माहितीचे काय करावे ते रेणूला सुचेना. पण कुतूहल तिला शान्त बसू देत नव्हतं.
ती गाडी कडे आली. मामा उभे होते. दोघे बसले आणि निघाले.
“मामा! तो माणूस मघाशी असं का म्हणाला कि, नेहमीचीच अरेंजमेंट. काय असते ती?” तिने शांततेचा भंग करत विचारले.
मामा थोडे अस्वस्थ झालेले तिला दिसले पण कसनुस हसत त्यांनी आव आणला.
” आगं.. काय नाय.. मी इथं नेहमीची महाराजा थाळी घेतो. पण तू होती म्हणून मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे आर्डर दिली. त्येच म्हणत होता तो. ” ते म्हणाले.
” त्यासाठी अरेंजमेंट हा शब्द मला नाही पटला. नेहमीची थाळी आणू कि वेगळं काही असं विचारलं असतं त्याने. ” ती आणखी थोडं खोचक पणे म्हणाली.
” काय सोनू झाडाझडती लावलीये माझी आ! आत्ताच तिकडं कमिटी मिटिंग मधी हेच करून आलोय आता तुझे भारीतले प्रश्न सुरु!” मामा तिच्या प्रश्नाला बगल देत म्हणाले.
“नाही…पण तुम्ही त्याच्यावर एवढे वैतागलात म्हणून मला जरा वेगळे वाटले. एवढं काय वैतागण्यासारखं विचारलं त्याने असं नाही वाटलं मला.” ती खोलात शिरण्यासाठी विचारत होती हे मामांना आता लक्षात आलं होतं.
” आजकाल ते शी आय डी का काय बघायला लागली वाटतं परत. लहान पणाची सवय तुजी. म्हाईते मला. नग लय इचार करू. ” मामा म्हणाले.
“नक्की ना?” तिने विचारले.
” हा तर मंग काय? मामाव विश्वास नाय व्हय. ” ते तिच्याकडे पहात म्हणाले.
” मामांवर विश्वास आहे पण मामांचा त्यांच्या सोनुवर पण विश्वास असावा असं मला वाटलं.” रेणुने त्यांना बोलतं करण्यासाठी पुढचं वाक्य फेकलं आणि तिरकं पाहात बारीक हसली.
” तू लय अडचणीत आणायलीस मला सोने. उग कायपण नको इचारूस मला नाय सांगता यायचं. ” मामा तिच्या प्रश्नांना टाळू पाहत होते.
“मामा तुमचं जे काही गुपित असेल ते माझ्याकडे अगदी सुरक्षित राहील. मन मोकळ करायला एखादी चांगली जागा मिळतं असेल तर ती डावलू नये मला तरी असं वाटत.” ती म्हणाली. मामांना असं कोंडीत पडलेलं तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं. तिला मजा येत होती आणि थोडं थ्रील सुद्धा वाटत होतं.
रेणूला कसला तरी संशय आलाय हे मामांना कळून चुकलं होत. पण तिच्यासमोर ते काहीही उघडं करून दाखवायला कचरत होते. तिची प्रतिक्रिया काय होईल? ती कुठे बोभाटा करेल का? बायका मुलांपर्यंत काही गेलं तर काय? अशा काळजीयुक्त प्रश्नानी त्यांना आता घेरले होते. पण जर सोनू विश्वास दाखवतीये तर करूयात का मन मोकळ? असाही प्रश्न मनात आलाच.
” कसंय ना सोनू बाळा. आज मी जे काही कमवलं. ते कमवताना वाढीवताना मला बऱ्याच लोकांची मदत झाली आणि बऱ्याच लोकांच्या मी कामी बी आलो. मग कामी आलेल्या लोकांमधी आणि आपल्यामधी काही नातीबंध तयार होतात. ते नातेबंध कवा कवा नाजूक पण बनतात. अशा नातेबंधनामधी कवा कवा मोहाची परिस्थिती पण तयार व्हते. त्या मोहाना माझ्यासारखा गडी जो आधीच थोडा कमतरपण अनुभवतोय. तो बळी पडला तर त्यात खरच मी गुन्हेगार होईल असं तुला वाटतं का सोनू? ” मामानी अतिशय वेगळ्या पद्धतीने तीला समजावलं आणि तिला ते पटलं देखील.
“मामा मी तर म्हणेन कि तुमचं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व उलट एखाद्याला मोहात पाडू शकेल. त्यामुळे यात काहीही आश्चर्य नाही कि तुम्ही अशा प्रकारच्या बंधनात अडकलात. मी स्वतः कितीतरी वेळा….” ती बोलता बोलता थांबली.
” काय कितीयेळा? ” मामानी थांबलेल्या रेणूला विचारले.
” काही नाही.” ती अवघडत म्हणाली.
” मला सगळं काय बोलाय लावती अन स्वतः हातचं राखून बोलती, हे काय खरं नाय सोनू. ” मामा तिला डिवचत म्हणाले.
” मला असं म्हणायचं होतं कि, मला असं वाटायचं कि पुरुषाने तुमच्या सारखं असावं एकदम अल्फा मेल.. स्वतःच्या जीवावर सगळं उभं करणारा. लोकांमध्ये आदर कामावणारा. दिलदार..हुशार राजकारणी.. रुबाब आहे तुमच्या जगण्यात. ” ती सावरत म्हणाली.
मामा गालात हसले.
” आता सांगा मला सगळं. ” तिने विचारले.
” काय सगळं? ” मामा म्हणाले.
” कसली अरेंजमेंट असते त्या हॉटेल मध्ये? ” तिने मिश्किल स्वरात विचारले.
” ह्म्म्म… कशाला सोनू खोलात घुसते? काय करणार जाणून घिऊन?” मामा तिला लडीवाळ स्वरात म्हणाले.
“सांगा तर.. तेवढंच वेळ जायला कारण असं पण अजून तासभर आहे पोहोचायला.” ती म्हणाली.
“सांगण्यासारखं तस काय नाय एवढं.. काही वर्षांपूर्वी गावातल्या त्यावेळी नव्यानीच आलेल्या मास्तरने कर्ज काढलेल आपल्या बँकेतून. मीच त्याला मिळवून दिलं. त्याने ते त्याच्या मेव्हण्यासाठी काढलं होतं. तो मेव्हणा निघाला नालायक. पैसे मिळाल्यावर गेला कुठंतरी पळून. कर्जदार मास्तर असल्यामुळं तोच कर्जाचे हफ्ते फेडणार होता. पण त्याच्या बायकोने आणि त्याने येऊन इनंती केली कि कायतरी माफी नाहीतर सवलत द्या. मी त्यांना व्याजदर कमी करून दिला आणि त्याच्या बायकोला ग्रामपंचायतीच्या ऑफिसात एंटऱ्या करायला कामावर ठेवलं. कर्जाचा हफ्ता कामाच्या पगारातून वळता केला. दोघेबी खुश. पण मग हे एवढ्यावर थांबतय व्हय. माझी आणि तिची गाठ पडायची हापिसात. एकदोन वेळा तालुक्याच्या ठिकाणी जाण येणं झालं. पोरगी तरुण आणि सुंदर होती. आमच्यात जरा जवळीक निर्माण झाली. त्यातून हे प्रकरण पुढ गेलं. आमी इथंच या हाटेल वरच यायचो मागे लॉज हाय. गावापासून लांब कोणाला कळणार म्हणून निवडलेली जागा. मास्तरला पण हे सगळं ठाऊक होतं. पण मी कधी त्याच्यावर कसला दबाव टाकला नाही. एकदा त्यानेच येऊन इनंती केली कि त्याला त्रास होतोय या गोष्टीचा. मग तिला समजावली आणि आमदाराला सांगून मास्तरला बदली करून दिली. तवर ह्यांचं कर्ज बी फिटत आलतं. उरलेलं मी भरून दोघांना मोकळ केलं. उग आपल्या मनाव बी कुठला लोड नको. मास्तरणी कवा शाप नाय दिला मला.” असा एक किस्सा मामानी ऐकवला.
“वाह मामा इथही तुम्ही गैरफायदा न घेता न्यायच केलात.” रेणू म्हणाली.
” अग तिच्या रूपाणी माझ्या आयुष्यात जे सुख आलं त्याबद्दल तिला धन्यवाद नको व्हय. मी एवढा करंटा नाय. ” ते म्हणाले.
” खरय मामा. म्हणून तर मी तुम्हाला मानते. You are the best. ” ती म्हणाली.
मामा हसले.
” मग अजून? ” तिने परत तिरका कटाक्ष टाकला.
” आता अजून काय? ” मामा गालात हसत म्हणाले.
” एकच तर नक्कीच नसणार. ” ती म्हणाली.
” तुज्या आत्याच्या एका लांबच्या मैत्रिणीची सून सहा महिन्या पूर्वी आपल्या इथं आली व्हती. तिला msc.agri. झालेली phd करीत होती आणि कांद्याच्या एका जातीवर तीच संशुधन चाललं होतं. ती पण तुझ्यागत लग्न झालेली होती.” ते बोलले आणि तिच्याकडे पाहून काही सूचक हसले.
त्या त्यांच्या वाक्याने आणि हसण्याने तिच्या छातीतून एक कळ पोटात गेली.
” तिचा नवरा बाहेर देशात कुठं कामानिमित्त 2 वर्ष राहणार होता. आमच्यात तिच्या पुढाकाराणीच जमलं. मी तिला शेतीवर न्यायचो आणायचो. तिकडं ती थांबायची दिवस दिवस भर. एकदा मला तिकडच्या अवजारांच्या खोलीमधी काम होतं म्हून गेलो तर ही तिथं नको त्या अवस्थेत एकटीच होती. मी निघालो तिथून. पण मला तिनी होऊनच स्वतःच्या अडचणी बद्दल आणि माणशीक त्रासाबद्दल सांगितलं. जेवढे दिवस होती तेवढे दिवस मग आमी इकडं याच लॉज वर यायचो. कधी मधी घरी पण. असं. एवढंच. पण मग त्यानंतर मला उमजल कि आपण उग का एखाद्या सन्याशा गत राहायचं? मिळत असलं तर हे सुख नकारायचं नाय. मी कधी कोणाला दुखवत नाय. पण एखाद बर माणूस येत असेल आयुष्यात तर नाकारत नाय. ती मास्तरची बायको अजून पण संपर्कात आहे. तिच्या नवऱ्याच्या नकळत भेटती. मी कधी तिला य म्हणत नाय. तिला वाटतं ती यती. मी रिकामा असलो तर जातो. हा पण ह्या सुखासाठी आजवर कधी नीच दर्जाच काम नाय केलं.” मामानी मन उघडं केलं होतं.
मामा तरुण स्त्रियांना सुखवतंच नाही तर त्यांच्याकडे येण्यासाठी प्रवृत्त पण करतात. म्हणजे त्यांचे पौरुष खासच असणार यात रेणूला शन्का नव्हती. तिला मघाच्या त्यांच्या त्या हसण्याने अजूनही जीवात होणारी थरथर जाणवत होती. अचानक तिच्या मांड्यामध्ये तिला उष्णता जाणवली. मामांच्या बोलण्याने तिला उत्तेजनेचा भाव दाटून आला. गाडी फाटकातून बंगल्याच्या आवारात घुसली. मामाचे घर आले होते.आजची रात्र काय घडवून आणणार होती तिलाही ठाऊक नव्हते.
-क्रमशः